मामला 'सोशल फोटो' शेअरींगचा.
हेमा मालिनी यांच्यासह त्यांच्या कार अपघातात बळी पडलेल्या मुलीचे फोटो काल संपुर्ण दिवसभरापासुन व्हॉट्सअॅप, फेसबुक सारख्या सोशल नेटवर्कींग साईट्स वर फिरत आहे. या अपघाताने मागील आठवड्यात झालेल्या बस अपघातात बळी पडलेल्या दोन मुलींची आठवण करून दिली. त्या दोन मुलींना तातडीने मदत करण्याऐवजी लोकांकडून त्यांचे 'फोटोसेशन' सुरू होते. अखेर उपचारास विलंब झाल्यामुळे त्यांचा मृत्यु झाला. एखादा अपघात झाल्यावर त्या अपघातातील लोकांना मदत करण्याऐवजी आजची तरूण पीढी हृदयशुन्यतेने त्यांचे फोटो काढून सोशल साईट्सवर टाकण्यात मात्र 'ऍक्टीव्ह' असते. वरून त्यावर अनेकदा अगदी खोचकपणे लिहीलेले असते की "ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा आणि या अपघातात बळी पडलेल्यांना न्याय द्या". मुळातच त्या अपघातात एखाद्याने दुर्दैवी जीव गमावला असेल त्याला जीव गमावल्यानंतर नेमका कोणता न्याय मिळणार हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहतो. हा विचार मदत न करता निव्वळ पोस्ट शेअर करणार्यांच्या मनात येणार तरी कधी...!! दररोज देशात होणार्या अनेक अपघातांचे फोटो सोशल नेटवर्कींग साईट्स वर फिरत असतात. सर्व अपघात हे दुर्दैवीच, त्या अपघातांची भीषणताही तीतकीच दाहक. पण लोकांची वृत्ती मात्र तीच. यात फरक असतो तो केवळ चेहर्यांचा आणि स्थळाचा.
गेल्या वर्षी कॉलेजमध्ये आमच्या 'Xpression Event' ला काही विद्यार्थांनी याच विषयावर ऍड सादर केल्या होत्या त्यांच्या विषयाचे खरचं कौतुक करावे लागेल. यावर कितीही जनजागृती केली तरी सोशल नेटवर्कींग वरून काय शेअर करावे हे सर्वस्वी वापरकर्त्यावर किंबहुना त्याच्या मानसीकतेवर अवलंबुन असते. त्यामुळे आपण काय शेअर करत आहोत त्या किती तथ्य आहे याचे भान नक्कीच बाळगायला हवे.
-प्रथमेश करजावकर.
४-७-२०१५
© Prathamesh Karjavkar.
No comments:
Post a Comment